मी हरलो तर कधीच निवडणूक लढवणार नाही- दिला शब्द
मी हरलो तर कधीच निवडणूक लढवणार नाही- दिला शब्द. दिल्ली निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली असून आता सर्व जनता व पक्ष फक्त निकालाचीच वाट पाहत आहेत. येत्या ११ फेब्रुवारी ला दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. दिल्लीत आमआदमी पक्षाचेच सरकार परत येणार असे अंदाज राजकीय सल्लेगार व तज्ञ देत असतानाच भाजपा नेते सुनिल यादव ट्वीट वर म्हणाले दिल्लीत केजरीवाल यांचा पराभव होणार असून भाजपचेच सरकार येणार आहे.
![]() |
| Sunil Yadav |
जर दिल्लीत भाजपा आली नाही तर मी परत निवडणूक लढवणार नाही, आयुष्यभर संघाचे काम करीन असेही सुनील यादव यांनी ट्वीट करून म्हटले आहे. त्याचबरोबर गृहमंत्री जेपी नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचाही माझ्यावर विश्वास असल्याचेही सांगितले.
परंतु बर्याचशा एक्झिट पोल नुसार केजरीवाल यांची आम आदमी पक्षाचेच सरकार येणार असल्याच दाखवल जात. निकाला नंतर काँग्रेस आमआदमी पार्टी बरोबर जाऊ शकत असे संकेत सुद्धा काही नेत्यांकडून दिले जात आहेत.
Tags:
Political

