राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बरीशी बकरे दगावली व बकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे महाराष्ट्रात मटणाचे दर अधिकच वाढले आहे. राज्यात मटणाचे दर वाढलेले असतानाच नाशिक, कोकण, पुणे या भागात बकरे मिळेनाशी झाली आहे. यामुळे इथल्या भागात मटणाचे रेट आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मटणाचे दर 560 ते 600 रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना मटण खाणे परवडेनाशी झाली आहे. सामान्य माणसाच्या ताटातून मटन नाहीशे झाल आहे. त्यामुळे आता स्वस्तातलं मटण खाण्यासाठी किमान तीन ते चार महिने वाट पहावी लागणार.